आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतून काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी आले होते, तर अनेकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, सूचना व अडचणी मांडल्या. नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी कचऱ्यासंबंधी समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या परिसरातील स्वच्छता, पाणी साचणे तसेच इतर नागरी समस्यांबाबत सूचना मांडल्या. संबंधित विभागांना आवश्यक सूचना देत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.
नागरिकांचा विश्वास, प्रेम व सतत मिळणारे सहकार्य हीच काम करण्याची प्रेरणा असून शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷