अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी नागरी संवाद मालिका "विकसित महाराष्ट्र @२०४७" या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक दिशांवर सखोल चर्चा झाली. मान्यवरांच्या मार्गदर्शनातून भविष्यातील सुशासन, विकास आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला.
आयोजक श्री. रणजीत चव्हाण (अध्यक्ष,AIILSG) व डॉ. जयराज फाटक (महासंचालक AIILSG) यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व जनप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या अनुभवी विचारांनी आणि मार्गदर्शनाने संवाद अधिक समृद्ध व परिणामकारक ठरला. अशा व्यासपीठांमधून विचारांची देवाणघेवाण होऊन विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यास बळ मिळते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷