आज नगरपरिषद कार्यालयात अनेक नागरिकांनी भेट देत विविध प्रश्न व अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांना वेळेत व समाधानकारक सेवा मिळावी यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, त्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
याचवेळी काही नागरिकांनी आपुलकीने विविध कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका देखील दिल्या. आंबेडकरी विचार मंच सामाजिक संस्था यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे आमंत्रण मिळाले. त्यानंतर चि. पंकज व चि.सौ.का.भूमिका यांच्या शुभविवाहासाठी त्यांनी निमंत्रण दिले. तसेच श्री समर्थ लॉजिस्टिक्स यांच्या भव्य उद्घाटन समारंभाचे निमंत्रण देण्यात आले.
या सर्वांनी दाखवलेला विश्वास व स्नेह याबद्दल मनःपूर्वक आभार. सर्व कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.. अंबरनाथकरांच्या आनंदाच्या क्षणांत सहभागी होण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. 🙏🏻
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷