आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालय येथे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध प्रभागांतील प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी परिसरातील नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक समस्या तसेच विकासकामांबाबत प्राप्त झालेल्या निवेदनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या अडचणी व सूचनांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आणि विकासकामांना गती देणे हीच आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर अंबरनाथच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अधिक दृढपणे पुढे नेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷