आज अंबरनाथ नगरपालिकेत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी भेट घेऊन आपल्या समस्या, तक्रारी व सूचना मांडल्या. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून, त्यावर योग्य आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.
प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ आणि दीर्घकालीन तोडगे काढण्यावर भर देणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच काही नागरिक सदिच्छा भेटीसाठी येऊन शुभेच्छा व्यक्त करत आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, ही बाब अधिक प्रेरणादायी आणि उर्जा देणारी ठरली.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷